Friday, March 15, 2024

            “ या देहाची हे दशा । आणि आत्मा 

                तो एथ ऐसा ।”


“ज्ञानेश्र्वरी-नित्यपाठ” या स्वामींच्या  “भावार्थ-दीपिका” गीता-तत्वाचं सार, मर्म म्हणून सकृतदर्शनी एकमेंका विरोधी वाटणाऱ्या अध्याय १३ मधील ओव्या स्वामींनी केंद्रबिंदु, महत्वाचा मुख्य विषय म्हणून निवडल्या.


क्र.५७ नंतरच्या ओव्या वाचताच लक्षात येतं की पंचमहाभूत संघातातून प्रकृतीच्या संयोगाने झालेले सर्व देह नाशिवंत आहेत पण देह वेष्टणात असलेलं आत्म-तत्व, शाश्र्वत, अमर अविनाशी, अज, नित्य, सर्वत्र, सदैव, समान निराकार व निर्गुण आहे.


आत्मा निर्गुण असल्याने देह आवरणांत असूनही कर्मबंधांनी लिप्त होत नाही.


“आपुले मरण पाहिले म्या डोळां- -”

अशा आत्म-साक्षात्कार, आत्मज्ञानाच्या अनुपम्य सोहाळ्या नंतर ईश्र्वर प्रणीत आपले विहीत कर्म काय याची स्पष्ट जाणीव होऊन त्यांच्या नव जीवनाची वाटचाल निश्र्चित करण्यासाठी त्यांनी मा जगदंबेचा कौल घेऊन ठरवले कीं- 


“सत्याचें दर्शन घडावे संपूर्ण।ध्येय हें लक्षून जीवनाचें॥१॥प्रेम-अहिंसेचे घवोनियां व्रत।लोक-सेवा-रत राहे सदा”॥२॥संजीवनी गाथा ६२॥


ध्येयाशी मनाने तन्मय स्वामी लिहितात-

“तन्मय होतां कुठली बोली ती द्वैताद्वैताचीस्वानुभवाविण कोण जाणता स्व-संवेद्यता त्याची”॥अमृत धारा६८॥


ज्याच्या अधिष्ठानावर देहाचे व्यापर चालतात, त्या द्वैताद्वैतातीत, आत्म- तत्वाचा अपरोक्ष अनुभव घेऊन स्वामींनी या प्रवासातील बारकावे, खाणाखुणा साहित्य रूपी वाटाड्या म्हणून आपल्या हाती दिले आहेत. 


देहबुद्धी ते आत्मबुद्धी करण्यासाठी स्वामींनी सोsहं साधना सांगितली-

“असे सहज परी सोsहं भावे करी सतत अभ्यास।हीच साधना जोंवरीं न तो झाला मोह-निरास”॥अमृधारा२५॥


आणि मी म्हणजे देह ही भ्रामक कल्पना दूर करायला स्वामी सांगतात - 


“ ‘मी मी’ म्हणसी परी जाणसी काय खरा ‘मी’ कोण  असे ‘काय’ ‘मी’ ‘मन’ ‘बुद्धी’ वा ‘प्राण’ ? पहा निरखोन । ‘प्राण’ बुद्धी मन काया माझी परि मी त्यांचा नाही । तीं ही नव्हती माझी कैसें लीला-कौतुक पाही !॥ गूढ न कांहीं येथ सर्वथा अर्थ उघड वाक्याचा  । जाण चराचरिं भरुनि राहिलों मीच एकला साचा”॥अ.धारा ११२ ते ११४॥


शेवटच्या साकींत  वाक्याचा शब्दानें 

 स्वामी महावाक्याचा निर्देश करतात ज्या महावाक्याचा निर्देश करतात, ते तत् त्वम् असिमहावाक्य 

श्रुतिवचनांतील चार महावाक्यांपैकी एक आहे. हे छांदोग्य उपनिषदांत आहे. यात पिता आरूणि त्याचा पुत्र श्वेतकेतु

ला सांगतो तूं स्वत:च(परमात्मा) आहेस

आपली उपनिषदें सत्य किंवा रूपक बोधकथांतून स्वामीं सारख्या सत्या- न्वेषकांना व विचारवंतांनां मार्गदर्शन करतात. मूलभूत चिंतन करणारे दोन उपनिषदातील एक श्रुतिवचन असे आहे

नायमात्मा प्रवचनेन लभ्य: न मेधया न बहुना श्रुतेन । यमेवैष वृणुते तेन लभ्य: तष्यैष आत्मा विवृणुते तनुं स्वाम”॥ कठोपनिषद (१/२/२३) मुंडक (३/२/३). थोडक्यात, एऱ्हवी असाध्य स्वयंप्रकाशी हा आत्मा जो सहस्पंदित होत त्याचा शोघ घेतो त्याची निवड स्वत: करतो.

“निधान सन्निध परि घोर तमीं इत स्तत: भ्रमलो मी ज्ञान-किरण-दर्शनें आतां सत्प्रकाश अन्तर्यामीं”॥अ.धारा १००॥ इथे लक्षात ठेवलं पाहिजे कीं सोsहंसूत्र, मूळ चा ज्ञानमय, प्रकाशमय किरण आहे व या परब्रह्माची ‘सोsहंही प्रकृती आहे 

अन्वय दृष्टीने विश्र्वाकडे पहाणाऱ्या 

स्वामींना सर्व दृश्य वस्तूंत परमात्माच दिसे म्हणून ते नि:शंक पणे लिहितात-

“पडे त्यासी पडो विश्र्वाचें हें कोडें । आम्हासी उघडें आत्म-रूप ॥१॥ जळीं स्थळीं काष्ठीं पाषाणीं संपूर्ण । आत्म- रूप जाण प्रकटलें ॥३॥आत्मरूप दृष्टि आत्म-रूप सृष्टि आत्मा पाठीं- पोटीं स्वामी म्हणे ”॥४॥ किंवा “आत्म-रूप आतां आघवा संसार। ठेली येरझार एकसरां॥२॥पावलो नैष्कर्म्य देहीं विदेहत्व । डोळां परतत्व देखियेलें”॥३॥संजीवनी गाथा ७४ व २०॥असे हे आत्म-रूपा चे पारणे इतक्या सोप्या शब्दांत सोsहं-हंसारूढ चैतन्य रूप स्वरूपानंद गुरू माऊलींनी सर्व भक्तांसाठी दिले आहे. त्यांच्याच चरण कमली अर्पण करून नैवेद्य म्हणून घेऊ.

माधव रानडे

Tuesday, February 27, 2024

 २७ फेब्रु. २०२४   “आत्मा जेणें हस्तगत रत्न होय


सद्गुरू स्वामी स्वरूपानंद (पांवस) यांनीं ज्ञानेश्र्वरीतील निवडक १०८ ओव्यांची जपमाळ ज्ञानेश्र्वरी नित्यपाठ केली. त्यांत क्र.१०४ वर ज्ञानेश्र्वरी १८/१३२३ 

हें गीतानाम विख्यात सर्व वाड्मयाचें मथित आत्मा जेणें हस्तगत रत्न होय ही ओवी येते.

अर्थ अगदी सोपा आहे, की गीताया नांवानें विश्र्वविख्यात हा ग्रंथ सर्व वाड्मयाचें  सार आहे. तद्वतच,

ज्ञानेश्र्वरी नित्यपाठहे भावार्थ दीपिका चे म्हणजेच ज्ञानेश्र्वरी चे सार आहे असे स्वत: स्वामींनी लिहिलें आहे.

याठिकाणी मला काही गोष्टी आवर्जून नमूद करायच्या आहेत (१) स्वामींनी  ज्ञानेश्र्वरी  नित्यपाठया संकलनात ज्ञानेश्र्वरी तील ओव्यांचा क्रम बदलला आहे (२)अध्याय १४ व १५ मधील एक ही ओवी या संकलनात नाही (३) तरीही स्वामींनी गीता तत्व-विचार सुसंबद्ध, स्पष्ट पण सार रुपाने मांडलाय. (४)

ज्ञानेश्र्वरी नित्यपाठचा महाराष्ट्रात अनेक घरात नियमीत पाठ होतो आणि यातील बहुसंख्य ज्ञानेश्र्वरी कडे आकृष्ट झाले. स्वामींनी लिहिलंय :- बाल्यापासुनि  गीताध्ययनीं होता मज बहु छंदतारुण्यीं तत्कथित-तत्व-सुख भोगीं आज अगाध” ॥अमृतधारा १३९ 

ही साकी स्वामींनी १५/२/१९३५ ला लिहिली व तेंच गीता-तत्व-सुख पुढे त्यांनी ज्ञानेश्र्वरी नित्यपाठच्या रूपे संकलीत केले आणि ही मोक्षरूपी संपत्ति समाजात मुक्तहस्ते वाटली.

गीता-तत्वाचा मुख्य बोध हा आहे की, आत्म-रूप मी देहापुरताच मर्यादित, सीमीत, नाही तर अमर्याद व व्यापक म्हणून देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी खरा मी अज, अमर, आहे त्या आत्म-रूपात तद्रूप व्हावे तदाकार व्हावे. ते स्वानुभव सांगतात:-

“हरि-रूप ध्याता हरि-नाम गातां ।हरि चि तत्वतां झालों आम्ही ॥१॥ आत्म-रूप आतां आघवा संसार । ठेली येरझार एकसरां ॥२॥पावलों नैष्कर्म्य देहीं विदेहत्व  डोळां पर-तत्व देखियेलें ॥३॥वा “ आता काय मज संन्यासाचें काज । निजांतरीं गुज प्रकटलें॥१॥प्रकटता घडे सहज-

संन्यास नैष्कर्म्य-पदास गांठियेलें ॥२॥ करोनि अकर्ता भोगोनि अभोक्ता ॥३॥ विश्र्वीं आत्म-सत्ता नांदतसे ॥४॥ संजीवनी गाथा अभंग क्र.२० व ५१॥ कारण 

सोsहं-भाव-प्रचीत येतां सहज- संयमी झाला । आत्म-रूप जगीं एक संचलें हा दृढ निश्र्चय केला ॥ अन्यथा

“अहंकार जो मन-बुद्धीचा घेऊनियां आधार । जीवा भुलवी सदा दाखवी जन्म-मरण-संसार ॥भावार्थ गीता १२/४७ व २६ ॥

ज्ञानेश्र्वर माऊलीं नी विश्र्वविख्यात गीते वर प्राकृतात ज्ञानेश्र्वरी चा अद्वितीय अलंकार राजमुकुट चढवून “तीरें संस्कृताची गहनें । तोडोनि मऱ्हाटिया शब्दसोपानें । - - -॥ज्ञानेश्र्वरी ११/९ माय मऱ्हाठीला महाराणी  पट्टराणी बनविले देशियेचे लावण्य अजरामर केले. मराठी ला राजतिलकाने श्रीमंत केले. माऊलींच्या मांदियाळीतील  अठरापगड समकालीन संतकवींनी या राजकोषात भाव बळावर मोलाची भर घातली. माऊली सांगतात-

“तीर्थ व्रत नेम भावेंवीण सिद्धी।

वायांचि उपाधि करिसी जना॥१॥ भावबळें आकळें येऱ्हवीं नाकळें ।

करतळीं आंवळे तैसा हरी ॥२॥

पारियाचा रवा घेतां भूमीवरी । यत्न परोपरी साधन तैसें ॥३॥ ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण ।दिधलें संपूर्ण माझ्या हातीं॥४॥हरिपाठ १२॥

आपल्या सुदैवानें स्वामींनी माऊलींचे ज्ञानेश्र्वरी, अनुभवामृत, चांगदेव 

पासष्ठी हे तीनही प्रमुख ग्रंथ अभंग रूपात तसेच गीता सोप्या प्रचलीत मराठीत साकी वृत्तात लिहून निर्गुण  परमात्मा हस्तगत रत्न होय असे केलें आहे. मराठी भाषा समृद्ध केली आहे.

आज जागतिक मराठी भाषा दिवस

त्या निमित्ताने आपण ज्ञानेश्र्वर माऊली आणि त्यांना साक्षात भगवान विष्णु: मानणाऱ्या चैतन्यरूप सोsहं-

हंसावतार सद्गुरु स्वामी स्वरूपानंद यांना मानाचा मुजरा.

त्यांच्या कृपाप्रसादाने स्फुरलेली ही शब्दसुमने त्यांच्या चरणीं सर्वभावे समर्पण.

माधव रानडे