Thursday, September 22, 2016

                      श्री स्वामींच्या “ अमृतधारा ”
                             भावार्थ विवरण (५)
श्री स्वामी सांगतात- “ गुरूकृपेवीण नाहीं आत्मज्ञान । वाउगा तो शीण साधनांचा । १।
सहज - साधन गुरू कृपा जाण । जीवाचे कल्याण तेणें होय ।। सं.गा. ६५/१-२ ।।
याचा साक्षात अनुभव, अपरोक्ष अनुभव मी नुक्ताच माझ्या आजारपणात घेतला. “ जेथे जातो तेथे “” या माझ्या १९८१ सालपासूनच्या अनुभवांचा चरमबिंदु  अचानकच, अपरंपार गुरूकृपेने, प्रकट झाला. जवळपास शून्य साधना असतांना, केवळ गुरूकृपेच्या नायगारा सदृश धबधब्यानं, क्षणार्धात, आत्मज्ञान झालं. सारे काही, स्वच्छ,स्पष्ट दिसूं लगलं. माझ्या सभोवतालचे कोणतीही कोणतीही घटना मला वाचतां येऊं लागली. नेमक्या याच वेळीं मला फार ताप २-३ पर्यंत येऊं लागला. १० सप्टेंबर ला मला पत्नीने, हेमंत बापट, संकेत उपासनी या मित्रांच्या सहाय्यानें, मुला-सुनेच्या सतत येत असलेल्या फोनांमुळे रात्रीं १० वा. ॲडमिट केलं.सर्वच फार काळजीत होते मी शांत होतो, दोन कारणांनीं. अत्यंत महत्वाचं म्हणजे १००% टक्के खात्री की माझी सद्गुरूमाऊली माझी काळजी धेत या सर्वांना निमित्त करीत मला तळहातावरच्या फोडासारखं जपते आहे. दुसरें कारण, ही घटना व या पाठवा ईश्वरी संकल्प मी पुस्तकासारखा वाचूं शकत होतो.
पण यामुळेच फार गंभीर पेच निर्माण झाले, व त्याची नको ती परिणीती होत गेली ज्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली.
उदाहरणार्थ,  रक्त तपासणी आधारित Dengue चं Diagnosis झाल्यनंतरही. Plateslates count, ४२००० पर्यंत खाली गेल्यावरही व हाॅस्पिटलमधील सर्वजण ओरडून सांगत असतांनाही, मी विश्रांती तर घेत नह्वतोच, तर ८-१० तास फोनवर बोलत होतो. पाचपट जोरानं गुरूसेवा ( माझ्या ठाम समजूतीप्रमाणे ) करीत होतो. माझ्या बायकोला जी माझी अहोरात्र सेवा करत होती अत्यंत वाईट पद्धतीनं अपमानीत करत होतो. भेटायला येणाऱ्या जवळपास साऱ्यांचाच अपमान करत होतो. भेटायला बोलावून देखील श्री बाबुराव देसाई याच्याशी उद्दामपणानं वागून नको नको ते सांगितले.
कितीतरी, लेख होतील अशी विचित्र वागणूक. उदा.४२००० काउंट असतांना Med Specialist नां सांगितलं १५ सप्टें. ला १२५००० चा आकडा पार होईल व १६ ला घरी. सर्वांच्या दृष्टीनं आकांडतांडव करत होतो, पण मला जसं दिसत होतं मी सांगत होतो.बायकोला, वेड लागायची वेळ आली.
अचानक घडलेल्या बदलाला मीच तयार नह्वतो, तर आजूबाचूचे कसे असणार ?
आतां घरी आलो. बरा झालो. पत्नीनें, श्री स्वामींच्या गादीवर  वै. भाऊमामांच्या मार्फत घेतलेल्या अनुग्रहाला १५ सप्टें ला २० वर्षें पूर्ण झाली, तिच्या नियमित साधनेची पुण्याई, माझ्या अनेकपट आहे ही वस्तुस्थिति आहे. याची तिलाही जणीव नाही. पण तिने वारंवार भाकलेल्या करुणेने, श्री स्वामींनीं मला शांत केलं आहे.
श्री स्वामींच्या साहित्यांत मला “ सोsहं हंसोपनिषद “ दिसतंय, मला ते “ SWAMI SWAROOPANAND ( Pawas ) A COSMIC CITIZEN “ त्यांच्या ५ अभंगांतून दिसतात व त्यावर    Documentary काढायचीच हा माझा ( दु ) राग्रह. असे एक ना अनेक विषयांमुळें, मीच पेच उत्पन्न केले आहेत, पण आतां वादळ शांत झालं आहे. 
मी हळूहळू सर्व उलगडा करूं शकेन असा विश्वास मला आहे. कारण श्री स्वामींच हे सर्व माझ्याकडून करून घेणार आहेत, हे मला दिसतंय.
अातां मला थकवा आलाय, म्हणून हे अर्धवटच Upload करतोय. २६-२७ सप्टें नंतर हलके हलके ठीक करणार आहे. 
हे सर्व आज पूर्ण करायची आज्ञा होती, मी, गुरूमाऊलींची क्षमा प्रार्थना करून, विश्रांती घेतोय.

 “ चिरंजीव परि सांप्रत झाला वेदान्ताचा अंत । मात्र तयाचीं भुतें नाचती इथें भरतखंडांत ” ।। ५९ ।।
स्वानुभवाविण वेदान्ताची पोपटपंची वायां । स्वप्नीं अमृता पिउनि कुणाची अमर जाहली काया ।। ६१ ।
“ वेदान्ताच्या थोतांडाची पाठीवरती झूल । घालुनी तदा होतों सजलों तुंदिल नंदीबैल ।। १४१ ।। ” “अमृतधारेतील”वर दिलेल्या साक्यांचे शब्द सकृतदर्शनीं  (वरवर) पाहता परखड / तिखट वाटले तरी त्याच्या मागचा हेतू व भावना ही “ बुडते हे जन देखवेना डोळां । म्हणूनी कळवळा येतसे । ” अशी उदात्त आहे. 
त्यामागें अनेक वर्षांचा अभ्यास व सखोल चिंतन आहे, हे श्री स्वामींच्या पत्रांतील पुढील उताऱ्यावरून लक्षांत येईल.
श्री स्वामींनीं काका लिमये या त्यांच्या गुरूबंधूना दि.१२-३-१९३४ रोजीं लिहिलेल्या पत्रांत ते लिहितात--  “ काका, आपलें संप्रदाय-विशिष्ट तत्वज्ञान आज १२ वर्षें मी स्वानुभवाच्या कसावर नानाविध प्रसंगीं भिन्नभिन्न अंगानीं घासून पाहात आहे आणि प्रतिप्रसंगीं त्याची उज्वलता अधिकाधिकच प्रत्ययास येत आहे. पण त्याचबरोबर हेंही लिहिणें अवश्य आहे कीं, पूर्वींच्या माझ्या संप्रदायाविषयींच्या भ्रामक कल्पनांत अनुभवानें किती तरी पालट घडून आला आहे.”
वर दिलेल्या उताऱ्यातींल एक एक शब्द ध्यानांत घेतला की पुढे दिलेल्या साक्यांचे मूळ कशांत आहे हें सहजच लक्षांत येते-
“ पुरे पुस्तकी विद्या ती कीं अवघी पोपटपंची । रणार्थ सेना पत्र चित्रिता असे काय कामाची ।। ६० ।।
स्वानुभवाविण वेदान्ताची पोपटपंची वायां । स्वप्नीं अमृता पिउनि कुणाची अमर जाहली काया ।।६१।।
परोपदेशे पांडित्याचा प्रकर्ष बहु दाखविती । स्वयें आचरूं जाता वसते धारण पांचावरती ।। ६२ ।।
गतानुगतिकत्वाची ऐसी पाहुनियां जन-रीति । विटलें मन जाउनि बैसलें ह्रदयाच्या एकान्तीं ।। ६३ ।।


“ समाजाला धर्मप्रवण करण्याच्या उद्देशानें स्थापन झालेल्या धर्मपीठांनीं किंवा सांप्रदायींनीं साधनांत गुप्तपणा ठेवणें अत्यंत अनिष्ट आणि घातांक आहे. त्यायोगें सामान्य जनतेची दिशाभूल करणें सहज शक्य होतें. साधनें स्पष्ट आणि उघड असतील तर त्यांचा कस लावणें सामान्य जनतेला जड वाटत नाहीं; किंबहुना त्यांची विचारशक्ति जागृत करून त्यांना सत्याचा अगर ज्ञानाचा मार्ग दाखविण्याचा हा एकच उपाय आहे.”
“वस्तुस्थिति अशी आहे कीं, स्वत:चा उद्धार किंवा स्वत:ची उन्नति स्वत:च करावयाची असते.”
“ सोsहं वृत्ति अंगीं बाणवून घेण्यासाठीं पराकाष्ठेचा प्रयास करण्यामध्यें एकच हेतु असतो आणि असावा आणि तो म्हणजे आपल्या अंत:करणांत क्षुद्र भावनांचा प्रादूर्भाव होऊं न देणें. जसजशी ही वृत्ति मानवी अंत:करणांत मुरत जाईल तसतसें त्याचें प्रत्यंतर ‘वाचे दिठि करासि’ येऊन त्याच्या आचरणांतील प्रगति स्पष्ट दिसूं लागेल.”
“ आणि प्रयत्न हा स्वाधीन असल्यामुळे ‘ प्रयत्नांतीं परमेश्वर ’ पदाची प्राप्ति करून घेणें हेंच मानवी जीवनाचें इतिकर्तव्य आहे एवढें लिहून पत्र पुरें करतो. ”


                                                                                                   माधव रानडे 

No comments: